महाराष्ट्र शासनाचे व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर, अनुपम खेर, महेश मांजरेकर, काजोल देवगण, मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांना पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक दरवर्षी राज्य सांस्कृतिक कार्य विभागाकडून विविध पुरस्कार दिले जातात. दरम्यान यावर्षी काही मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.

मुंबई : चित्रपटसृष्टीत विशेष योगदान देणाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक दरवर्षी राज्य सांस्कृतिक कार्य विभागाकडून विविध पुरस्कार दिले जातात. दरम्यान, यावर्षी मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली. आज शेलार यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली, यातून त्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

पुरस्कार खालीलप्रमाणे…

१) अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार जाहीर, १० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे पुरस्कारचे स्वरुप असणार आहे.
२) अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
३) सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाच्या स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार यांना जाहीर. रोख रक्कम १० लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
४) अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जाहीर. रोख रक्कम ६ लाख रुपये पुरस्काराचे स्वरूप असणार आहे

५) गझल गायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, रोख रक्कम १० लाख, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

भव्यदिव्य कार्यक्रम होणार…

दरम्यान, हे सर्व पुरस्कार २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, वरळी, मुंबई येथे एका भव्यदिव्य कार्यक्रमात होणार आहे. दरम्यान, ह्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमात गायक सुरेश वाडकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली. तसेच याव्यतिरिक्त संविधानाचे अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे सांगीतिक मानवंदना कार्यक्रम होणार आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News