मुंबईत संसर्गजन्य आजारांचे रूग्ण वाढले; पावसाळ्याच काळजी घेण्याचे आवाहन

पावसाळा सुरू होताच मुंबईत ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीसारख्या लक्षणांनी डोके वर काढले आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास बळावला आहे.

पावसाळा सुरू होताच मुंबईत ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीसारख्या लक्षणांनी डोके वर काढले आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखीचा त्रास बळावला आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, आजाराची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

रूग्णांचे प्रमाण वाढले, आरोग्य धोक्यात

रुग्णांना घसादुखीसह डोकेदुखी, अंगदुखीसारखी लक्षणे दिसतात. त्यानंतर ताप येतो. तापाचा जोर चार-पाच दिवस राहतो. ताप गेल्यानंतरही प्रचंड थकवा, डोकेदुखी यासारखी लक्षणे राहतात. तीव्र स्वरूपाची घसादुखी, जेवताना घशामध्ये वेदना होणे, ही लक्षणे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहेत’, असे डॉक्टरांनी सांगितले. ‘पावसाळा सुरू झाल्यावर ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा फैलाव करणाऱ्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तुलनेने कमी असल्याने त्यांना आजाराचा संसर्गही लगेच होतो. सर्दी, खोकला किंवा अंगदुखी यासारखे कोणतेही लक्षण मुलांमध्ये आढळले तर त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये.

धारावीत पावसाळ्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो यासारखे आजार हमखास डोके वर काढतात. तातडीने वैद्यकीय उपचार हवे असतील तर लो. टिळक रुग्णालयामध्ये नेले जाते. पावसाळी आजारांच्या व्यतिरिक्त इतर लेप्टोसारख्या आजाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज डॉ. अनिल पाचणेकर व्यक्त करतात. प्रत्येक वर्षी येथे लेप्टोच्या प्रादुर्भावाचा धोका असतो

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

पावसाळ्यात हवामानात बदल होत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. या काळात सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, हिवताप, आणि जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. उकळलेले आणि स्वच्छ पाणी प्यावे. भिजलेल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नये. मच्छरांपासून संरक्षणासाठी जाळी, क्रीम किंवा मच्छरदाणी वापरावी. बाहेरचे तेलकट, फास्ट फूड खाणे टाळावे. फळे व भाजी नीट धुवून खावी. हात स्वच्छ धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक आहे. थोडीशी काळजी घेतल्यास पावसाळ्यात आरोग्य चांगले राखता येते आणि आजारांपासून सुरक्षित राहता येते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News