१०० दिवसानंत आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम, देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा

शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता काही धोरणात्मक बदल करण्यात आले तर काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले.

Devendra Fadnavis– महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागाच्या कामांना गती मिळावी, आणि लोकांना अधिक लाभ मिळावा यासाठी महत्वाचा विभागाच्या कामासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार घेत होता. याचा निकाल नुकताच लागला आहे. १०० दिवसांनंतर आता मुख्यमंत्र्यांनी नवीन योजना आखली आहे.

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या ३ बाबींवर आधारित १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री परिषदेच्या बैठकीनंतर या १५० दिवसांच्या कृती आराखड्याबाबत सूतोवाच केले. त्याची माहिती बुधवारी जाहीर होणार.

तीन टप्प्यांत विभागाचे धोरण…

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर हा कार्यक्रम आधारित असेल. विकसित महाराष्ट्र मुद्यांवर २०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यांत विभागाचे धोरण काय असेल याबाबत परिमाण निश्चित करण्याचे त्यांनी सांगितले. १०० शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतून प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झाले. आता नागरिकांना आधिक चांगली सेवा देण्यासाठी हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

१०० दिवसांच्या कृती आराखड्याला चांगला प्रतिसाद

राज्यातील १२,५०० शासकीय कार्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली. मंत्रालयातील ४८ विभाग या कार्यक्रमात सहभागी झाले. या विभागातील ९०२ विषयांवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना ७०६ विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले. १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर धोरणात्मक आणि प्रक्रियात्मक बदल करण्यात आले. या कार्यक्रमास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे १५० दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News