आजकालच्या या डिजिटल जगात, मोबाईल फोन असणे ही प्रत्येकासाठी एक सामान्य गोष्ट झाली आहे. मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, प्रत्येकाकडे स्वतःचा मोबाईल फोन आहे. लोक त्याद्वारे ऑफिस आणि शाळेची कामे करतात. काही लोक सर्वात महागडे फोन सोबत ठेवतात, तर काही लोक कामासाठी कीपॅड फोन ठेवतात. हे एक माध्यम आहे, जे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडते. घरी बसूनच लोकांना एकमेकांची माहिती मिळते. पूर्वी हे काम पोस्टाद्वारे केले जात होते पण आता त्याची जागा मोबाईल फोनने घेतली आहे. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, की देशात पहिला फोन कोणी आणि कोणाला केला? त्याबद्दल आज जाणून घेऊया..
भारतातील पहिला मोबाईल कॉल
सुरुवातीचे मोबाईल सेवेचे दर
सुरुवातीला फोन करण्यासाठी 16 रुपये 40 पैसे प्रति मिनीट असे शुल्क आकारण्यात येत होते. इनकमिंग कॉल शुल्क लागू होते. त्यासाठी 8 रुपये 40 पैसे असा दर होता. पहिल्या तीन वर्षांपर्यंत देशातील मोबाईलधारकांची संख्या 8 लाखांपर्यंत पोचली होती.

एका मिनिटात किती पैसे खर्च झाले?
भारतामधील पहिला मोबाईल कॉल पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी 31 जुलै 1995 रोजी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला होता. त्यावेळी, एका मिनिटाच्या कॉलसाठी 8.40 रुपये खर्च येत होता, आणि जर पीक तासांमध्ये कॉल केला तर तो खर्च 16.80 रुपये प्रति मिनिट इतका होता.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)