पावसाळा येताच घरात माशांची संख्या वाढते. स्वयंपाकघरापासून बाथरूम, बेडरूम आणि अंगणापर्यंत सर्वत्र त्यांची दहशत वाढते. अन्नावर माश्याही बसतात. त्यामुळे त्याचा आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागू शकते. माश्यांमुळे खाज सुटणे, पुरळ आणि अॅलर्जी होऊ शकते. तर मग आम्ही तुम्हाला हे टाळण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्हाला ह्या समस्येपासून मुक्तता मिळेल…
कापूर
पावसाळ्यात घरात माशा भिरभिरण्याची शक्यता जास्त असते. कारण या काळात ओलावा वाढतो, ज्यामुळे माश्यांसाठी पोषक वातावरण तयार होते. कापूर या समस्येवर एक सोपा उपाय आहे. कापूर हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे जो माश्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकतो. कापूर जाळून त्याचा धूर घरात पसरवा. कापडात गुंडाळून कापूर घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. कापडात गुंडाळलेला कापूर घरातील खिडक्या आणि दाराजवळ ठेवा, जेणेकरून माश्या घरात प्रवेश करू शकणार नाहीत. कापूरात असलेले घटक माशांना दूर ठेवतात.

व्हिनेगर
पावसाळ्यात घरातील माशांचे प्रमाण वाढते, कारण पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे माश्यांची वाढ होते. व्हिनेगर माश्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकते. व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून स्प्रे बाटलीत भरा. माश्या येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा. पाण्यात व्हिनेगर मिसळून फरशी पुसल्यास माशा कमी होतात.
तुळशीची पानं
जवळपास सगळ्यांच्याच घरामध्ये तुळस असते. तुळशीच्या पानांच्या वासामुळे माशा घरामध्ये येत नाहीत. तुळशीच्या पानांपासून होममेड स्प्रे तयार करता येतो. यामुळे माशा पळून जातात. याकरता तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा आणि गरम पाण्यात टाकून ठेवा. थोड्या वेळाने हे पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये टाका आणि माशा येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करा.
घर स्वच्छ ठेवा
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)