मोराच्या पंखांमुळे पाली खरोखरच घराबाहेर पळून जातात का? काय आहे विज्ञान जाणून घ्या…

‘या’ उपायांनी पाली घर सोडून पळून जातील; संपेल कायमचा त्रास..

उन्हाळ्यात पालींची संख्या अनेकदा वाढते. भिंतीवर, गेटवर, सर्वत्र पाली दिसतात. कधीकधी मुले किंवा प्रौढांनाही पालींची भीती वाटते, ज्यामुळे ते त्यांना घराबाहेर हाकलण्याचा विचार करतात. अनेकजण घरातील पाली काढण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करतात. यासाठी ते विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात जेणेकरून पाल घरातून पळून जाईल. पालींना पळवण्यासाठी मोरपिसांचा वापर अनेकजण करतात. असे म्हणतात की पाली मोराच्या पिसांपासून पळून जातात. पण हे खरंच घडतं का? असं म्हणतात की पाली मोराचे पंख पाहताच पळून जातात. हे खरोखर घडते की नाही याबद्दलची संपूर्ण माहिती या बातमीत जाणून घेऊया.

विज्ञानात्मक दृष्ट्या

काही लोकांचा असा विश्वास आहे की मोराच्या पिसांना एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. पालींना हा वास आवडत नाही, त्यामुळे पाली त्याचा वास घेतल्यानंतर पळून जातात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आतापर्यंत असा कोणताही पुरावा नाही की पाली मोराच्या पिसांपासून पळून जातात हे सिद्ध करू शकेल. मोरपिसामुळे पाली पळून जातात, यामागे कोणतेही विज्ञानात्मक कारण नाही. शास्त्रज्ञांच्या मते, मोराच्या पिसांमध्ये असा कोणताही वास नसतो जो पालींना त्रास देऊ शकतो आणि त्यांना घराबाहेर घालवू शकतो.

पाल घालवण्यासाठी इतर उपाय

कांद्याचा रस

पाली घरात दिसल्या की, त्यांच्यावर कांद्याचा रस फवारा. त्यासाठी एका बाटलीमध्ये कांद्याचा रस तयार करून ठेवा आणि पाली दिसल्या की, त्यांच्यावर फवारा, यामुळे पाली पळून जातील. कांद्याच्या रसाच्या वासामुळे पाली परत घरात येत नाहीत.

कॉफी आणि तंबाखूचे मिश्रण

कॉफी आणि तंबाखूचे मिश्रण तयार करा. कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्यामुळे पाली परत तिथे येणार नाहीत, असेही काही लोक म्हणतात. 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News