शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे… तसेच नारळ पाण्यामुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. आजारी रूग्ण, वृद्ध माणसे आणि गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता असते.
नारळ पाणी पिण्याचे फायदे
हायड्रेशन
नारळपाणी पाण्याची कमतरता दूर करते. नारळपाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे इम्युनिटी चांगली राहते.

बद्धकोष्ठतेवर उपयोगी
पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो.
पचनक्रिया सुधारते
नारळपाणी प्यायल्याने अँटीएजिंगची समस्या दूर होते. नारळपाणी प्यायल्यास पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात.खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन करण्यासाठीही शरीराला पाण्याची गरज असते. नारळपाण्यामध्ये पोटॅशिअम आणि इतर अनेक मिनरल्स असतात. नारळपाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन, पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते. नारळपाण्यामुळे तुमच्या शरीराची पचनशक्ती सुधारते. दिवसभरात एक ग्लास नारळपाणी प्यायल्याने चांगला फायदा होऊ शकतो.
किडनीचे आरोग्य चांगले राहते
किडनीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नारळपाण्याचे सेवन करणे चांगले असते. यामुळे मुतखड्याचा त्रास उद्भवण्याची शक्यता कमी होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
आजारी रूग्ण, वृद्ध माणसे आणि गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता असते.