मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा सुरळीत सुुरु राहणार, पांजरापूर उदंचन केंद्रातील नियोजित काम रद्द

प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ वरील दाबवाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचे काम प्रशासनाला शक्य होणार नाही.

Mumbai Water Supply – मुंबईकरांच्या पाण्याबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. परंतू आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई शहर विभाग, पूर्व उपनगरांतील संबंधित विभागांचा पाणीपुरवठा दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत राहणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पाणीकपात रद्द…

दरम्यान, मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी – निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने हाती घेण्यात येणारे काम रद्द करण्यात आले आहे. परिणामी, बुधवार दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १३ तासांसाठी यापूर्वी घोषित केलेली पाणीकपात आता रद्द करण्यात आली आहे. असं पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिकूल हवामान आणि पावसामुळे काम रद्द…

प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ वरील दाबवाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचे काम प्रशासनाला शक्य होणार नाही. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील संबंधित विभागांचा पाणीपुरवठा दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत राहणार आहे. सदर काम रद्द झाल्याने शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील विभागांचा पाणीपुरवठा दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत राहील, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News