मुंबईकरांच्या सुसाट लोकल प्रवासासाठी 17 हजार कोटींचे प्रकल्प, बदलापूर-कल्याण रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण

मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांच्या झालेल्या भेटीत मुंबईतील लोकल समस्यांबाबत चर्चा पार पडली. यावेळी मुंबईतील लोकल व्यवस्थेबाबत चर्चा झाली. केंद्र सरकार मुंबईकरांचा लोकल प्रवास जलद करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिलंय.

मुंबई – मुंबईकरांची लोकल कोंडी सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, मुंबईकरांचा लोकल प्रवास सुसाट व्हावा यासाठी मुंबईत 17 हजार कोटींचे प्रकल्प कार्यान्वित असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय. मुंबई लोकलसाठी कवच 5 ही नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून यामुळे दोन लोकलमधील अंतर 180 सेकंदांवरुन 150 सेंकदांवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकल्सची निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही त्यांनी दिलीय. पॉइंट मशीन आणि मायक्रो टनेलिंगच्या नवीन तंत्रज्ञानामुळे पावसाळ्यात गाड्या ठप्प पडणार नाहीत, असंही रेल्वेमंत्री म्हणालेत.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1910702428858572970

मुंबईकरांसाठी नवं काय?

1. कल्याण ते बदलापूर या मार्गांवर तिसरी आणि चौथी मार्गिका टाकण्याचं काम लवकरच सुरु होणार
2. कल्याण ते आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकचं कामही लवकरच सुरु होणार
3. हार्बर रेल्वे गोरेगावहून थेट बोरिवलीपर्यंत विस्तारीकरणाच्या कामाला गती
4. बोरिवली ते विरार सहाव्या मार्गिकचे काम.
5. विवार ते डहाणू रोड आणि कर्जत-पनवेल कॉरिडॉर यांची कामे प्रगतीपथावर

महाराष्ट्रासाठी नवीन काय?

1. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण
2. गोंदिया ते बल्लारशाह 240 किमी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपयांना मंजुरी
3. अर्थ संकल्पात महाराष्ट्रासाठी 23, 700 कोटींची तरतूद
4. रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी, अपघात रोखण्यासाठी प्रयत्न
5. कोकण रेल्वे मंडळ रेल्वेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु

ऑफिसच्या वेळा बदलणार?

मुंबईतील लोकल सेवेवर वाढत्या गर्दीचा ताण पाहता, ऑफिसच्या बदलण्याबाबत विचार सुरु असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करता येतोय का, याचा आढावा घेण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. मुंबईतील ऑफिसेसच्या वेळा बदलण्याबाबत यापूर्वीही अनेकदा चर्चा झाल्यात मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा ऑफिसेसच्या वेळा बदलण्याच्या चर्चांना तोंड फुटलंय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News