Sadguru Shri Shankar Maharaj: महाराष्ट्रातला संतांची भूमी म्हटलं जातं. याठिकाणी अनेक संत वास्तव्यास होते. त्यातीलच एक म्हणजे श्री शंकर महाराज होय. शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले महान संत आहेत.
योगीराज शंकर महाराजांची समाधी-
महाराजांची समाधी पुणेपासून थोड्या अंतरावर सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांनी २४ एप्रिल १९४७ सोमवारी समाधी घेतली आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, आईवडील, शिक्षण, गुरू, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील फारसा पाहायला मिळत नाही. मान्यतेनुसार त्यांना सिगारेटचा धूर आवडत असल्याचं सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर त्यांच्या मठात अगरबत्ती ऐवजी सिगारेट पेटवली जात असल्याचं सांगितलं जातं.

शंकर महाराजांचा जन्म-
प्रचलित कथांनुसार, शंकर महाराज कैलासहून आल्याचे म्हटले जाते. मान्यतेनुसार एक फार चांगले गृहस्थ होते. परंतु त्यांना मुलंबाळ नव्हते. एकदा त्यांना स्वप्नात असा दृश्यांत झाला कि भगवान शंकर त्यांना रानात जायला सांगत आहेत. रानात जा तुला मुल मिळेल असं त्यांनी त्या गृहस्थाला सांगितलं.
ते गृहस्थ रानात गेले. आणि त्यांना खरोखरच एक अवघ्या दोन वर्षांचं मुल मिळालं. त्यामुळे ते आनंदी झाले. भगवान शंकराच्या कृपेने आपल्याला अपत्य प्राप्त झाले, त्यामुळे त्या गृहस्थाने त्या मुलाचं नाव शंकर असं ठेवलं. तेच पुढे जाऊन संत शंकर बनले.
योगिराज श्री शंकर महाराज नेहमी आपल्या भक्तांना आपल्या समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत.महाराज जेव्हा अक्कलकोटला येत असत, तेव्हा मोठ्या प्रेमाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास तेथील वटवृक्षाच्या छायेत बसत. पूर्ण रात्रभर त्याठिकाणी जागरण करीत आणि गुरूशिष्यांच्या भेटी होत. त्यांच्या सोबत शुभराय मठाचे महंत जनार्दन बुवा व जानुबुवा असत. श्री स्वामी समर्थ महाराज हे त्यांचे एकमेव गुरू होते.