मानवी जीवनाचे चक्र जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूने संपते. पण मृत्यूनंतर काय होते? आत्मा खरोखर पुनर्जन्म घेतो का? हे प्रश्न शतकानुशतके कुतूहलाचा विषय राहिले आहेत. हिंदू धर्मात, मृत्यूनंतरच्या जीवनाचे आणि पुनर्जन्माचे रहस्य समजून घेण्यात गरुड पुराण महत्त्वाची भूमिका बजावते. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर तिथेच राहते, मात्र आत्मा शरीरातून निघून जातो. मात्र स्वर्गात किंवा नरकात आत्मा नेमका किती दिवस राहतो, असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. या प्रश्नाचे उत्तर गरुड पुराणात देण्यात आले आहे.
मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास यमलोकापासून सुरू होतो. मृत्युदेवता यमराजाचे सेवक असलेले यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील जन्म त्याच्या कर्मांवर अवलंबून असतो. गरुड पुराणानुसार, 13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला यमलोकाच्या मार्गावर जावे लागते. यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात. स्वर्ग लोक, पितृ लोक आणि नरक लोक असे तीन मार्ग असतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कर्माच्या आधारे त्याला कोणत्या मार्गावर पाठवायचे हे निश्चित केले जाते.
गरुड पुराणात नेमकं काय सांगितल आहे?
गरुड पुराणाने सांगितले आहे की, मृत्युपश्चात आत्म्याला पुनर्जन्म मिळण्यास 3 ते 40 दिवसांचा अवधी लागतो. या काळात आत्मा आपल्या कर्मानुसार स्वर्ग, नरक किंवा इतर मार्गांनी प्रवास करते. 3 ते 40 दिवसात आत्मा पुनर्जन्म घेते. पुनर्जन्म कोणत्या योनीमध्ये आणि किती दिवसांनी होईल, हे आत्म्याच्या कर्म आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या धार्मिक कार्यांवर अवलंबून असते. हिंदू धर्मात, मृत्यू झाल्यावर 13 दिवस गरुड पुराण पाठ केला जातो, ज्यामुळे आत्मा लवकर पुनर्जन्माला जाऊ शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
