‘या’ पांढऱ्या वस्तू हातातून पडणं आहे अशुभ, जाणून घ्या काय सांगत वास्तुशास्त्र

शास्त्रानुसार हातातून काही वस्तू पडणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की या गोष्टी व्यक्तीच्या आगामी वाईट काळाकडे निर्देश करतात. तुमच्या हातूनही अशी काही वस्तू पडली तर लगेच सावध व्हा.

वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांबद्दल माहिती देण्याचे काम करतो. आपण जे काही काम करत आहोत. त्या वेळी आपल्या आजूबाजूला जे काही घडत असेल ते. तो आपल्याला येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल संकेत देतो. अनेकदा आपण घाईत असतो आणि वस्तू आपल्या हातातून निसटून पडतात. ही गोष्ट अगदी सामान्य असली तरी वास्तुशास्त्रात ती अशुभ मानली जाते. हातातून वस्तू पडणे हे येऊ घातलेल्या संकटाचे लक्षण आहे असे म्हणतात. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पडणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते.

तांदूळ

हिंदू देवी-देवतांच्या पूजेमध्ये तांदूळ वापरला जातो. हे सर्वात शुद्ध धान्य मानलं जातं. तांदूळ पडणं किंवा तांदूळ भरलेलं भांडे पडणं हे अशुभ मानले जाते. काही धार्मिक परंपरेनुसार, हे अशुभ संकेत देतात. तांदूळ हे शुद्ध धान्याचे प्रतीक आहे. तांदूळ हे अन्न आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. ते पडणे किंवा तांदूळ भरलेले भांडे पडणे हे अशुभ मानले जाते, कारण ते अडचणी किंवा वाईट घटना दर्शवते.

दूध

वास्तुशास्त्रानुसार, दूध हातातून पडणे अशुभ मानले जाते, कारण दूधाचा संबंध चंद्राशी आणि आर्थिक स्थितीशी जोडला जातो. दुधाचा ग्लास पडणे किंवा उकळणारे दूध उतू जाणे हे आर्थिक समस्या दर्शवते. दूध हे चंद्राचे प्रतीक आहे आणि गॅसवर उकळणारे दूध सांडल्यास किंवा दुधाचा ग्लास पडल्यास ते अशुभ मानले जाते. हे आर्थिक अडचणी दर्शवते, असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार, दुध हातातून पडणे आर्थिक समस्या, नुकसान किंवा खर्च वाढण्याची शक्यता दर्शवते. 

मीठ

वास्तुशास्त्रात, मीठ हातातून पडणं अशुभ मानलं जातं. मीठ हे केवळ चव वाढवण्यासाठी नाही, तर ते नशिबाशीही संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मीठ हा चंद्र आणि शुक्र ग्रहांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हातातून मीठ पडल्यास आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात.

नारळ

ज्योतिषशास्त्रानुसार, नारळ हातातून पडणे अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नारळ पडल्यास, एखाद्या व्यक्तीच्या नोकरी किंवा करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. नारळ ही अशी वस्तू आहे ज्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक पूजाविधीत याचा वापर निश्चितच केला जातो. शास्त्रांनुसार, एखाद्या शुभ कार्यक्रमादरम्यान हातातून नारळ पडला तर ते दुर्दैवाचे लक्षण आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News