T-20 Mumbai League : भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो. पाऊला पाऊलावर आणि गल्ली गल्लीत क्रिकेट खेळले जाते. भारतात एकही दिवस असा जात नसेल की जिथे क्रिकेटवर चर्चा, गप्पा होत नाहीत. सध्या आयपीएल सुरू आहे. त्यामुळे भारतात क्रिकेटमध्ये वातावरण झाले. आयपीएलच्या धर्तीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने टी-ट्वेंटी क्रिकेट लिग ही स्पर्धा 2018 रोजी केली होती.
मात्र कोरोनानंतर ही स्पर्धा होऊ शकली नाही. तब्बल 6 वर्षानंतर पुन्हा एकदा या स्पर्धा मुंबईत होत आहे. दरम्यान, ही स्पर्धा खेळाडूसाठी खूप महत्त्वाची आहे. या स्पर्धेतील खेळाडू भविष्यात भारतीय क्रिकेट संघात खेळताना दिसतील, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला आहे.

कमबॅक करण्यासाठी स्पर्धा महत्त्वाची…
दुसरीकडे या स्पर्धेतून अनेक महत्त्वाचे खेळाडू समोर आले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. ज्या खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स होत नसल्यामुळे त्यांचा जो बॅड पॅच सुरू असतो. त्या खेळाडूंना कमबॅक करण्यासाठी रणजी ट्रॉफी, मुश्ताक अली ट्राफी अशा विविध स्पर्धा असतात. या स्पर्धेच्या माध्यमातून ते खेळाडू कमबॅक करू शकतात. तसेच टी-20 मुंबई लीग ही स्पर्धा देखील खेळाडूसाठी कमबॅक करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तसेच या स्पर्धेतून अनेक खेळाडू पुढे आले आहेत.
T-20 मुंबई लीग संघ किती?
– नॉर्थ मुंबई पँथर्स
– ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट
– एआरसीएस अंधेरी
– नमो वांद्रे ब्लास्टर्स
– आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स
– ईगल ठाणे स्ट्रायकर्स
– सोबो मुंबई फाल्कन्स
– मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स
स्पर्धा कधीपासून सुरु?
दरम्यान, या स्पर्धेचा चेहरा म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. या लिगला प्रोत्साहान देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. दरम्यान, ही स्पर्धा आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर म्हणजे २७ मे २०२५ रोजी टी-20 मुंबई लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे.