दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करा, एकनाथ शिंदेंचे पालिका प्रशासनाला निर्देश

कुर्ला येथील प्रीमियर कंपनीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या मिठी नदीशेजारील नागरिकांचे पुनर्वसन केलेल्या इमारतींची डागडुजी तातडीने करण्यात यावे, तसेच या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणी स्वच्छता आणि कचरा उचलणे अशा मूलभूत सुविधा पुरवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.

Eknath Shinde : मुंबईत पाऊस सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी दरड पडण्याच्या घटना घडताहेत. त्यामुळं दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्यात याव्यात. तसेच धोकादायक व अतिधोकादायक ठिकाणाी म्हाडा, एसआरए यांचे प्रकल्प सुरू आहेत. अशा प्रकल्पांमध्ये अतिधोकादायक ठिकाणच्या रहिवाशांना सामावून घेऊन, धोरण तयार करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिलेत.

अतिधोकादायक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या…

दरम्यान, कुर्ला येथील तकीया वॉर्ड भागात असलेल्या २० एकर जमिनीवरील घरांसाठी क्लस्टर योजना राबविण्याची विनंती यावेळी कतरण्यात आली. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीधारकांच्या समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच धोकादायक ठिकाणी म्हाडा, एसआरएचे प्रकल्प सुरू असतील तर त्या प्रकल्पांमधील काही घरांमध्ये अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना सर्वोच्च प्राधान्याठी धोरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या बसवाव्यात…

मदत व पुनर्वसन विभागाकडे असलेल्या निधीतून मुंबईतील दरडप्रवण भागातील सुमारे ४२ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या बसविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच याभागातील चुनाभट्टी येथे डोंगराळ भागात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना होत असल्याने तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत आमदार कुडाळकर यांनी मागणी केली होती. त्याचबरोबर चांदीवली येथील मतदार संघात अशाच प्रकारचा भाग असल्याचे आमदार लांडे यांनी यावेळी सांगितले होते.

संजय गांधी उद्यानमधील नागरिकांचे पुनर्वसन करा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईकरांसाठी फुफ्फुस आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राष्ट्रीय उद्यान आवश्यकच असून यामधील नागरिकांचे पुनर्वसन करणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यातही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, तसेच चांदीवलीतील एमएमआरडीएने बांधलेल्या पीएपी इमारतींची तातडीने दुरुस्ती करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


About Author

Astha Sutar

Other Latest News