Congress – महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत घोटाळा असल्याचं म्हणत चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लेख लिहिला होता. यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाले असून, निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. याविरोधात प्रदेश काँग्रेस आज गुरुवारी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे.
घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी…
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील आंदोलनात पक्षाचे नेते सहभागी होणारेत. तसेच विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती असताना भाजपा युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारवरही संशय निर्माण झालेला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळावे व भाजपा युतीचे पानीपत झाले होते. त्यामुळं मतदान घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसची आहे.

मतदाना वाढीचा मोठा घोटाळा…
निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे. मतदान संपल्यानंतर ५८ टक्के जाहीर केलेले मतदार दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के दाखवून तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे. महायुतीच्या विरोधात वातावरण असताना महायुती कशी जिंकली? या आंदोलनात विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे. आजच्या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.