मुंबई : राज्यात सध्या उन्हाचा कडाका आहे. तापमानाचा पारा वाढला आहे. धरणातील पाण्याच्या साठा यात सातत्याने घट होत असल्याने मुंबईत पाणीबाणी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत टॅंकर चालकांनी संप पुकाराला आहे. यामुळे मुंबईत पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याचा शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील पाण्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत, ते स्पष्ट करा आणि पाण्याचा प्रश्न पुढील ४८ तासांत सोडवा, अन्यथा पालिकेच्या कार्यालयावर शिवसेना धडक मोर्चा काढेल, असा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. आज त्याने पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील पाणी प्रश्न पेटणार…
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारकडे पैसे नाहीत. राज्याची तिजोरी पोखरली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुकट योजना आणल्या आहेत. कामगारचे पगार याचा निधी दुसरीकडे वर्ग केल्या जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडवला अहे. त्याप्रमाणे भविष्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार रखडतील, अशी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ दिवसांतून एकदा एकदा पाणीपुरवठा होतो, अशीच परिस्थिती मुंबईत आहे. मुंबईतील चाळ सोसायटी, सोसायटी, बिल्डींग, रस्त्याची कामं, मॉल्स तसेच पायाभूत सुविधांची कामं यात जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी वॉटर-टँकर असोसिएशन मुंबईत पाणीपुरवठा करते. पण टँकर असोसिएशनने आधीच संप पुकारला आहे. परिणामी मुंबईत पाणी प्रश्न पेटणायची आदित्य ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारकडे पैसे नाहीत. राज्याची तिजोरी पोखरली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुकट योजना आणल्या आहेत. कामगारचे पगार याचा निधी दुसरीकडे वर्ग केल्या जात आहे. शक्यता आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
परिस्थितीला ‘एसंशि’ जबाबदार…
एसटी कर्मचाऱ्यांचे हे जनसेवा करतात. पण त्यांचे पगार वेळेत होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची जर संपाची हाक दिली तर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांचे मोठे हाल होतील. हा सरकारने विचार केला पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज्यातील पाणी प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न, बेरोजगारी, तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याला ७ तारखेला देणार असे सरकारने सांगितले आहे. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून, पैसा गेला कुठे? असा सवeल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत राज्यातील परिस्थितीला एसंशि सरकार जबाबदार असल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर चढवला.