India : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीपासून मुक्त होऊन भारत एक सार्वभौम राष्ट्र बनला, मात्र कोणत्याही नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासाठी फक्त स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नसते, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणे देखील तितकेच गरजेचे असते. म्हणजेच इतर देशांकडून मान्यता मिळणे आवश्यक असते.
आता प्रश्न असा निर्माण होतो, की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वप्रथम कोणत्या देशाने भारताला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिल्यांदा मान्यता दिली? कदाचित तुम्हाला वाटत असेल की अमेरिका, रशिया किंवा ब्रिटनने दिली असेल, पण सत्य काही वेगळेच आहे. चला तर मग, खरी गोष्ट काय आहे हे जाणून घेऊया.

सर्वप्रथम भारताला मान्यता देणारा देश कोणता?
भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा अनेक देशांनी एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. तथापि, सर्वप्रथम कोणत्या देशाने ही मान्यता दिली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. काही अहवालांनुसार, भारताला सर्वप्रथम मान्यता देणारा देश अमेरिका होता, असे सांगितले जाते. अमेरिकेने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतात आपले दूतावास सुरू केले होते. याशिवाय इंग्लंड, यूएसएसआर (माजी सोविएत संघ) आणि फ्रान्स यांनी देखील भारताला मान्यता दिली होती.
पाकिस्तानला मान्यता देणार पहिला देश
पाकिस्तानबाबत बोलायचे झाल्यास, पाकिस्तानला सर्वप्रथम मान्यता देणारा देश ईराण होता. त्यावेळी ईराण “इम्पीरियल स्टेट ऑफ ईराण” म्हणून ओळखला जायचा. नंतर इतर अनेक देशांनी भारताशी संबंध प्रस्थापित केले आणि एक देश म्हणून त्याला मान्यता दिली.
भारत कोणत्या देशांना मान्यता देत नाही?
जगात अनेक असे देश आहेत, ज्यांना भारत एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता देत नाही. यामध्ये सर्वप्रथम अब्खाझियाचे नाव घेतले जाते, ज्याला अनेक देश जॉर्जियाचा भाग मानतात. त्याचप्रमाणे कोसोवो देखील या यादीत आहे. जरी ते संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य राष्ट्र असले तरी भारत त्याला मान्यता देत नाही. तैवानलाही भारत मान्यता देत नाही, कारण भारत “वन चायना पॉलिसी”ला समर्थन देतो. याशिवाय सोमालीलँडचे नावही या यादीत सामील आहे.