पहाटे तुळशीला पाणी घालण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या…

तुळशीला पाणी घालताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालणे टाळावे, असे सांगितले जाते. तसेच, मासिक पाळीच्या काळात महिलांनी तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे टाळावे.

पहाटे तुळशीला पाणी घालणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होते, असे मानले जाते. पहाटे तुळशीला पाणी घालण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊया..

तुळशीला पाणी घालण्याचे धार्मिक महत्त्व

पहाटे तुळशीला पाणी घालणे हे धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि ती लक्ष्मीचा अवतार मानली जाते. त्यामुळे, रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे शुभ मानले जाते. यामागे पुराणात एक कथा सांगितली जाते, जी जालिंदर नावाच्या राक्षसाशी संबंधित आहे.

पुराणातील कथा

पुराणानुसार, जालिंदर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता, ज्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर देवांनाही त्रास दिला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती, त्यामुळे त्याचे रक्षण होत होते. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात.  देवाने वृंदाचे व्रत भंग करण्यासाठी विष्णूंनी जालिंदरचे रूप धारण करून तिच्याशी संबंध ठेवले. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते. तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

तुळशीला पाणी घालण्याचे वैज्ञानिक महत्त्व

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे, पहाटे तुळशीला पाणी दिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्यासाठीही चांगले असते. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तुळशीला पाणी घातल्याने मन प्रसन्न राहते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते, असे मानले जाते. तुळशीला पाणी दिल्याने घरातील वातावरण सकारात्मक आणि शांत राहते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News