हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की वास्तुशास्त्राचे महत्त्व फक्त घर किंवा इमारत बांधतानाच राहते, परंतु तसे नाही, घर बांधल्यानंतरही घरात ठेवलेल्या वस्तूंबाबत वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. घर बांधताना वास्तु नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रगतीमध्ये पायऱ्या महत्त्वाची भूमिका बजावतात. पण पायऱ्यांची योग्य दिशा याची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या घराच्या पायऱ्यांशी संबंधित वास्तू नियम
ब्रह्मस्थानावर पायऱ्या बांधल्या असतील तर काय करावे?
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही इमारतीचा किंवा घराचा मध्य भाग हा ब्रह्मस्थान मानला जातो. जर तुमच्या घरात ब्रह्म स्थानावर पायऱ्या बांधल्या असतील तर काळजी करण्याची गरज नाही, काही उपाय करून तुम्ही वास्तुदोष टाळू शकता. पायऱ्यांमुळे निर्माण होणारा वास्तू दोष दूर करण्यासाठी ब्रह्म भागाला नेहमी पिवळा रंग द्यावा, या रंगामुळे वास्तुदोष कमी होतो. या ठिकाणी पिवळे कमळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. याशिवाय, दररोज कापूर जाळल्याने वास्तुदोष कमी होतो.

जिना कोणत्या दिशेला असावा?
वास्तुशास्त्रानुसार, घराचा जिना दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असणे शुभ मानले जाते. दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला जिना बांधल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. उत्तर-पूर्व (ईशान्य) किंवा पूर्व दिशेला जिना असणे नकारात्मक परिणाम करू शकते. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर-पूर्व दिशा (ईशान्य) देव-देवतांचा वास असतो, त्यामुळे तिथे जिना नसावा, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थानी जिना नसावा. या ठिकाणी जिना असेल तर घरात दारिद्र्य येतं असं मानलं जातं.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)