कोकणासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी, आज राज्यात पावसाची स्थिती काय?

कोकणासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather : पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. दरम्यान, आज राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात पावसामुळे अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणसह घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

दरम्यान, कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी ५-३० पासून दिनांक २५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेत गेल्या २४ तासात मुसळधार पावसामुळं अनेक गावांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा फटका पिकांना देखील बसला आहे.

ऑरेंज अलर्ट जारी…

दुसरीकडे कोकणासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४, रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३ आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News