एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके मदत व बचावासाठी सज्ज, कोणत्या जिल्ह्यात किती पथके?

आपत्तीजन्य परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क झाली असून, राज्यातील विविध भागात ही पथके तैनात करण्यात आली आहेत.

NDRF, SDRF Rescue Teams : मान्सूनपूर्वी रविवारी आणि सोमवारी पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरात पावसाने सर्वांची दैना केली. राज्यात मागील २४ तासांमध्ये (२९ मी रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगरात सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस झाला आहे. मुंबई २९.८ मिमी, ठाणे २९.५ मिमी, पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळं आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क झाली आहेत.

पथके तैनात कुठे आणि किती?

दरम्यान, मुसळधार पावसामुळं अनेक दुर्घटना घडतात. तसेच आपत्तीजन्य परिस्थितीत उद्भवते. त्यामुळं मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके सतर्क झाली असून, राज्यातील विविध भागात ही पथके तैनात करण्यात आली आहेत. पुणे मुख्यालय येथे एनडीआरएफची दोन पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. नागपूर व धुळे येथे एसडीआरएफची प्रत्येकी दोन पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. तर मुंबई शहर व  उपनगरमध्ये एनडीआरएफची तीन पथके, पालघरमध्ये एक पथके तैनात ठेवण्यात आले आहे. अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

पावसामुळं दुर्घटना कुठे?

दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई उपनगर येथे झाड पडून दोन, पुणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात २६  प्राणी, वर्धा जिल्ह्यात एक आणि चंद्रपूर जिल्ह्यात एक प्राणी मृत झाला आहे. मुंबई शहरमध्ये झाड पडून दोन व्यक्ती, पालघर जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती आणि सातारा जिल्ह्यात बंधाऱ्यात पडून एक व्यक्ती मृत पावली आहे. अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

मुंबई काळाचौकी येथे भारत आईस कंपनीमधून होणारी अमोनिया वायुची गळती मुंबई महानगरपालिका आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करुन थांबवली असल्याचे सांगण्यात आले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News