संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जूनला आळंदीतून निघाल्या आहे. यापुढे केवळ विठ्ठलाचं नाव घेत ते पुढील कित्येक दिवस असाच पायी प्रवास करतील. मनात विठ्ठलाच्या दर्शनाची ज्योत तेवत ठेवत शेवटी 5 जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपुरला पोहोचतील.
माऊलींच्या पादुकांचं आज निरा नदीत स्नान
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज वाल्मीकीची नगरी असलेल्या वाल्हे नगरीचा निरोप घेत नीरा स्नानासाठी प्रस्थान ठेवले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. तत्पूर्वी दुपारी हा विसावा नीरा नदीच्या काठावर विसरणार असून दुपारी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये निरास्नान घातलं जाणार आहे. आज सकाळी साडेसहा वाजता माऊलींचा हा सोहळा नीरा नदीच्या काठावर दुपारच्या विसाव्यासाठी मार्गस्थ झाला आहे.

नीरा स्नानाचे महत्व मोठे; वारकऱ्यांत उत्साह
ज्ञानेश्वर माऊली हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते. त्यांच्या अध्यात्मिक कार्यामुळे आजही लाखो भक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमार्ग चालतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना मोठे महत्त्व आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूर वारीसाठी त्यांची पालखी निघते. पालखी निघण्यापूर्वी नेहमीप्रमाणे त्यांच्या पादुकांचे नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात येते. या स्नानाला “नीरा स्नान” म्हणतात. हे एक पवित्र आणि भक्तिभावाने भरलेले धार्मिक सोहळा असतो.
हजारो भक्त या सोहळ्यात सहभागी होतात. पादुकांचे स्नान झाल्यानंतर पूजन, आरती आणि कीर्तन होते. या परंपरेमुळे भक्तांमध्ये एकात्मता निर्माण होते. हा क्षण भक्तांसाठी अत्यंत मंगलमय असतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या या परंपरेने भक्तीची अमूल्य अशी परंपरा जपली जाते. तिकडे पंढरपुरात देखील आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू आहे.